मुंबई – भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जीवलग मित्र विनोद कांबळी सध्या आर्थिक समस्येला तोंड देत आहे. बीसीसीआयकडून ( BCCI ) निवृत्त खेळाडूंना मिळत असलेल्या महिना 30 हजार रुपये पेन्शनवर त्याची गुजराण चालली आहे, मात्र, आता त्याला निवड समितीच्या अध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यानेही बीसीसीआयकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
#NZvsIND | न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली! पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरा सामना अपूर्ण राहिला
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर बीसीसीआयने ( BCCI ) चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली व नव्याने अर्ज मागवले. त्याची मुदत सोमवारी संपली व आता या अर्जांची छाननी होणार असून त्यासाठी नेमल्या जात असलेल्या समितीकडून उमेदवारांना मुलाखती व सादरीकरणासाठी बोलावले जाणार आहे. त्यानंतर त्यांची शॉर्टलीस्ट करण्यात येईल व त्यानंतरच नवी निवड समिती जाहीर केली जाणार आहे.
#NZvsIND | न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली! पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरा सामना अपूर्ण राहिला
कांबळीने सचिनप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती, मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली व 1996 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर त्याचे संघातील स्थानही पक्के राहिले नाही. काही काळानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर त्यानंतर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. बीसीसीआयने ( BCCI ) निवृत्त क्रिकेटपटूंना त्यांच्या सामन्यांच्या संख्येच्या निकषानुसार पेन्शन देण्यास सुरुवात केली. त्यात कांबळीला दरमहा 30 हजार रुपये देण्यात येत आहेत.
सचिनच्याच अकादमीत कांबळीही प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र, सातत्याने लांबचा प्रवास करत पहाटे पाच वाजता त्याला जावे लागत असल्याने त्याने हे काम सोडले व नव्या नोकरीच्या शोधात होता. आता त्याने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदास रस दाखवला असून त्यासाठी अर्जही दाखल केला आहे. त्यातच मुंबईकर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजित आगरकर यानेही अर्ज केल्यामुळे आता या दोन मुंबईकरांमध्येही स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.