जळोची- बारामतीत एका दिवसात नऊ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असल्याने बारामती करांच्या चिंतेत वाढ झाली असून, आणखी पंचवीस जणांचे रिपोर्ट यायचे आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल नेमका काय येतोय. याकडे प्रशासनासह, बारामती करांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
करोना ग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लगल्याने बारामतीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. दि.११ रोजी १७ तपासण्या झालेल्या मध्ये नऊ रुग्ण पाँझिटिव्ह निघाल्याने बारामतीकर चिंतेत आहेत.
अजूनही २५ रुग्णांचे अहवाल येणे असल्याने त्यांचा अहवाल नेमका काय येतोय या विवंचनेत प्रशासन व बारामतीकर नागरिक आहेत.प्रशासनाने एकाच दिवसात अचानक कोरोनाचे नऊ रुग्ण सापडल्याने कठोर उपाययोजना करने गरजेचे असल्याचे नागरिकांकडून याबाबतची मागणी होऊ लागली आहे.
बारामती मध्ये दि. ११ रोजी करोना बाधित रुग्णांचा आकडा ४० वर पोहचले होता. तो आज ४९ वर पोहचला आहे. आता येणाऱ्या २५ जणांचा अहवाल काय येतो. यावर पुढील निर्णय अवलंबून आहे. बारामतीत अनेक नागरिक मास्क न लावताच फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन (सोशल डिस्टिंगचे) पालन केले जात नाही.
बारामती येथील रुई कोव्हिड केअर सेंटर येथे पोजिटिव्ह रुग्णांसाठी २० खाटांची तर संशयित रुग्णांसाठी १० खाटांची संख्या उपलब्ध आहे.यामधील ६ खाटा अतिदक्षता विभागाच्या असून येथे सर्व रुग्णांसाठी ऑक्सिजनचि सुविधा उपलब्ध आहे.ज्या रुग्णांना करोनाची लक्षणे आढळून येतील त्यांना आज दि.१२ पासून ४० रुग्णांना दाखल करून घेणार असल्याचे डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले.
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात ३५ खाटांची सोय उपलब्ध आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास प्रशासनाने आतापासूनच खाजगी दवाखाने ताब्यात घेण्याची मागणी बारामतीकर नागरिक करीत आहेत.