T20 World Cup 2024 Umpires List : टी-20 विश्वचषक 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होत आहे. नुकतेच भारताने T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. भारताव्यतिरिक्त इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांनी या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
मात्र, आता आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी पंच (अंपायर) आणि मॅच रेफरीजची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने एकूण 20 अंपायर्स आणि 6 मॅच रेफरीजची वर्ल्ड कपसाठी नावं घोषित केली आहेत. या यादीत कुमार धर्मसेनाशिवाय ख्रिस ब्राउन आणि रिचर्ड कॅटलब्रोसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. आयसीसीने भारतातून दोघांना पंच म्हणून स्थान दिलंय. नितीन मेनन आणि जयरामन मदनगोपाल हे पंचगिरी करणार आहेत. तर सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथ यांचा समावेश केला आहे.
टी-20 विश्वचषकातील पंचांच्या यादीबदल बोलयाचे झाले तर यामध्ये ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, अलाउद्दीन पालेकर, रिचर्ड केटलबरो, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, अहसान रियाझ, अहसान रास , पॉल रिफेल, लँगटन रसरे, शाहिद सैकत, रॉडनी टकर, ॲलेक्स व्हर्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब यांचा समावेश आहे. तर सामनाधिकारी (मॅच रेफरी) म्हणून डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ हे काम पाहतील. या पंचांवर आणि सामनाधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आयसीसीने ही नावे निश्चित केली आहेत. वास्तविक, ICC टूर्नामेंटमध्ये ICC पॅनल पंचांची निवड करते.
Four senior men’s event debutants off to the #T20WorldCup 2024.
The 26 match officials announced for the first round of the upcoming tournament ⬇https://t.co/Ni0y0ESsTA
— ICC (@ICC) May 3, 2024
वेस्ट इंडिज आणि अमेरिका या स्पर्धेचे भूषवणार यजमानपद…
दरम्यान, वेस्ट इंडिज व्यतिरिक्त, T20 वर्ल्ड कप 2024 अमेरिकेच्या भूमीवर आयोजित केला जाईल. ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच केएल राहुल, रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांसारख्या अनेक मोठ्या नावांना टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलेले नाही. मात्र, शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान