विलिनीकरणाच्या नावाखाली सहा बॅंकांच बंद केल्या
चेन्नाई: केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दहा बॅंकांचे विलिनीकरण करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्या विरोधात ऑल इंडिया बॅंक एम्प्लाईज असोशिएशनच्या कर्मचाऱ्यांनी आज येथे जोरदार निदर्शने केली. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सार्वजनिक आणि खासगी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले.
सरकारच्या बॅंक विलिनीकरणाचा सरळ अर्थ सहा बॅंका बंद करून टाकण्या सारखा आहे. त्याला सरकारने विलिनीकरणाचे गोंडस नाव दिले असले तरी सहा बॅंकांचे अस्तित्व आज संपले आहे. हे चांगले लक्षण मानता येणार नाही.राष्ट्रीय कृत बॅंकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे असा दावा या कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले आहे. सन 2008 च्या जागतिक मंदित देशाची बॅंकिंग सिस्टीम पुर्ण अबाधित राहिली होती त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे योगदान मोठे आहे असे त्यांनी नमूद केले.