मुंबई : मुंबईच्या वांद्रे स्टेशन परिसरात आज शेकडो नागरिकांनी गर्दी केली. मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट असताना नागरिक अचानक रस्त्यावर आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. हे सर्व नागरिक स्थलांतरित मजूर असून घरी जाण्याची मागणी करीत होते. १४ एप्रिल नंतर लॉकडाऊन संपेल या अपेक्षेने ते रेल्वे स्टेशनवर घरी जाण्यासाठी जमले होते. वांद्रे परिसरातील कामगारांना हटवण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Mumbai: A large group of migrant labourers gathered in Bandra, demanding for permission to return to their native states. They later dispersed after police and local leaders intervened and asked them to vacate. pic.twitter.com/uKdyUXzmnJ
— ANI (@ANI) April 14, 2020
केंद्र सरकार कामगारांना घरी पोहचवण्यात अपयशी ठरल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्थलांतरित कामगारांना अन्न आणि निवारा नको आहे, त्यांना घरी जायचे आहे; असे ट्विट त्यांनी केले आहे. तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉक डाउनच कालावधी ३ मेपर्यंत घेतला असून कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.