मुंबई – कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, देशातील कोरोनाबाधित रुगणांच्या संख्येत वाढच होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
त्यानंतर आज दुपारी 4 च्या सुमारास वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1186973284975708/?sfnsn=wiwspmo&extid=koe45PrBTks1OoGc&d=n&vh=e
त्यानंतर काही वेळातच बांद्रा पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आणि अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी रस्त्यावर येणे गंभीर बाब आहे.