शिवकाशी : भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फटाका उत्पादक देश आहे. पहिला क्रमांक अजूनही चीनच्या नावावर आहे. भारतामध्ये फटाका निर्मितीमध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे शिवकाशी हे शहर आहे. भारतात तयार होणाऱ्या एकूण फटाक्यांपैकी 80 टक्के फटाके फक्त शिवकाशी या एकट्या शहरामध्ये तयार होतात.
केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांच्या उत्पादनावर आणि वापरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातल्याने आता शिवकाशीमध्ये फटाका उत्पादनांमध्ये निम्मी घट झाली आहे. 2020 मध्ये शिवकाशीमध्ये फटाके निर्मितीमध्ये तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. 2021 मध्ये हा आकडा पंधराशे कोटीपर्यंत कमी आला आहे. एकेकाळी शिवकाशी हे शहर दुष्काळग्रस्त शहर होते. या शहरात कोणतीही शेती करणे शक्य नव्हते. सर्वत्र नुसता उजाड वाळवंटी प्रदेश होता. तेव्हा नादर बंधू या दोन उद्योजक बंधूनी या शहरांमध्ये फटाके निर्मितीचा व्यवसाय सुरू केला.
1942 पासून शिवकाशी शहरांमध्ये फटाक्यांचे उत्पादन सुरू आहे त्यापूर्वी भारतामध्ये सर्व फटाक्यांची आयात युरोपमधून केली जात असे पण 1940 च्या एक्सप्लोझिव ऍक्टनंतर भारतात फटाक्यांचे उत्पादन सुरू झाले आणि त्याचा फायदा नादर बंधूंनी घेतला आणि शिवकाशी मध्ये फटाके उत्पादन सुरू केले नादर बंधूंचे अनिल आणि अय्यर हे ब्रँड आजही लोकप्रिय आहेत आज घडीला शिवकाशी मध्ये 680 फटाके कारखाने असून त्यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे.
अर्थात बदललेल्या कायद्यामुळे या व्यवसायावरील परिणाम झाला आहे पण फटाक्यांची राजधानी असलेले शिवकाशी हे शहर फक्त फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध नसून डायर्या आणि कॅलेंडर्स आणि पोस्टरची छपाईसाठी सुद्धा शिवकाशी प्रसिद्ध आहे त्यामुळे फटाक्याप्रमाणे शिवकाशी शहरामध्ये असे अनेक कारखाने सध्या मोठा व्यवसाय करत आहे