कोयनानगर, – पाटण तालुका कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावर अडूळ गावचे बाळकृष्ण पाटील तर उपसभापतिपदी तारळे भागातील घोटील गावचे विलास गोंडांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
४५ वर्षानंतर पाटणकर गटाकडुन देसाई गटाकडे सत्तांतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे वर्चस्व आहे. गेल्या महिन्यात कृषी ऊत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या सर्वाधिक १५ जागा निवडून देऊन या कृषी ऊत्पन्न बाजार समितीतील पाटणकर गटाच्या ४५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावला होता. विरोधी पाटणकर गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
देसाई गटाकडून बाळकृष्ण पाटील, मानसिंग कदम, दादासो जाधव, विलास गोंडांबे, राजेंद्र पाटील, संग्राम मोकाशी, सीताराम सूर्यवंशी, जयश्री पवार, वैशाली शिंदे, नितीन यादव, धनाजी गुजर, जोतिराज काळे, समीर भोसले, सुधाकर देसाई, सिद्धार्थ गायकवाड हे तर पाटणकर गटाकडून आनंदराव पवार, बाळासाहेब महाजन, अरविंद पाटील हे निवडून आले आहेत.