लंडन- गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्र खराब हवामानाचा फटका पीक पाण्याला बसला असून मोठ्या प्रमाणावर पिके वाया गेल्याने आगामी कालावधीमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये जगातील अनेक देशांना नैसर्गिक आपत्ती आणि बदललेल्या हवामानाचा फटका बसल्याचे दिसून आले ब्राझील या देशामध्ये थंडी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कॉफी पिकाला त्याचा फटका बसला चीनमध्ये आलेल्या महापुरामुळे जनावरांमधील रोगाचे प्रमाण वाढले आहे.
आणि त्याचाही फटका शेतीला बसला अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे पिके वाळून गेली युरोपमधील अनेक देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उभी पिके पाण्यात गेली आहेत ब्राझील हा साखरेचा पण मोठा उत्पादक देश आहे पण गेल्या काही महिन्यांपासून तिथे थंडीबरोबरच दुष्काळाची परिस्थिती असल्याने पिकांना पाणी देणे सुद्धा अवघड झाले आहे.
युनोच्या फूड सिस्टिम समित 2021चे विशेष दूत आणि रवांडाचे माजी कृषि मंत्री आग्नेस काली बाटा यांनी ही परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे म्हटले आहेत सध्या जगा मध्ये ज्या नैसर्गिक घटना घडत आहेत त्याचा मोठा फटका पीक पाण्याला बसत असून आगामी कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तू महाग होण्याचा धोका त्यांनी बोलून दाखवला बदलते हवामान आणि त्यामुळे होणारे नुकसान याकडे आपण वेळीच लक्ष दिले नाही तर जागतिक कृषी अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे