Bacchu Kadu : राज्यातील राजकारण शिंदे-फडणवीस सरकार एकत्र आल्यापासून यातील काही नेत्यांची मंत्रिपदावरून असणारी नाराजी उघडपणे दिसून येत होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून ही नाराजी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी मंत्रालय कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले.
वर्ध्यातील सेवाग्राम याठिकाणी दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू (Bacchu Kadu)म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. मंत्रालयातच पाणी मुरते. हे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, असे म्हणत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
त्यासोबतच त्यांनी (Bacchu Kadu)अधिकाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवले. ‘माणसे मोठी असली पाहिजे, घरे मोठी असून फायदा नाही. एवढ्या मोठ्या मंत्रालयात कालच एका अधिकाऱ्यास झापले. तिथेच चिरीमिरी चालते. एका बदल साठी मंत्रालयात काय काय करावे लागते, याची सर्वांना कल्पना आहे. यात बदल आवश्यक आहे, असेही त्यांनी (Bacchu Kadu)यावेळी म्हटले.
तसेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य असल्याची प्रशस्ती पण त्यांनी दिली. यावेळी उपस्थित दिव्यांग बंधवांशी त्यांनी संवाद साधला. शेकडो दीव्यांग बांधव या शिबिरात सहभागी झाले आहेत. त्यांची चांगलीच गर्दी उसळली होती.