ऍडलेड – ऍडलेडला गुरूवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याने भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ झाला आहे. यापूर्वीच्या दोन कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकल्यामुळे या मालिकेतही विजय मिळवत अनोखी हॅट्ट्रिक साकार करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन कसोटी मालिका जिंकण्याची संधी भारताला आहे. या आधीच्या दोन मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे ही मालिका भारताने जिंकली तर सलग तीन मालिका जिंकत हॅट्ट्रिक करण्याची संधी भारतीय संघ मिळवणारका हाच प्रश्न आहे.
गेल्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 ने पराभूत केले होते. हा भारताचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करणारा विराट कोहली भारताचाच नव्हे तर,आशिया खंडातीलही पहिलाच कर्णधार ठरला आहे. त्यापूर्वीही ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यावर मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे यंदा अनोखीकामगिरी करण्याची संधी भारताला लाभलेली आहे.
1947-48 पासून आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 26 कसोटी मालिका झाल्या आहेत. त्यातील 12 ऑस्ट्रेलियाने तर, 9 भारताने जिंकल्या आहेत. 5 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 98 पैकी 42 कसोटीत तर, भराताने 28 कसोटीत विजय मिळाला आहे. यापैकी 27 कसोटी अनिर्णित ठरल्या तर, एक कसोटी टाय झाली आहे.