मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्यावरून वादंग निर्माण झाला. आंबेडकराच्या या कृतीवरून भाजपने आंबेडकरांवर टीका केली. तर आंबेडकरांची ही कृती उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? असा सवाल करून ठाकरेंना अडचणीत आनले. अशातच मुंबईत लागलेल्या एका बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या बॅनरवरून मुंबई पोलिस देखील आता सतर्क झाले आहे. कारण, मुंबई शहरात ठाकरे-आंबेडकर आणि औरंगजेब यांचे एकत्र फोटो असलेले बॅनर्स झळकल्याने हे बॅनर्स कोणी लावले, याचा तपास केला जात आहे.
माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले. मध्यरात्री अज्ञातांनी हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सकाळी हे बॅनर्स पाहिल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरू झाली. स्थानिक शिवसैनिकांनी तत्काळ हे बॅनर्स हटवले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कुणी तरी हा खोडसाळपणा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
Hoardings of former Maharashtra CM Uddhav Thackeray and Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar with Aurangzeb’s picture in it, put up in Mahim area of Mumbai.
Posters were put up at night, no information yet on who put them up. It has been removed now. No complaint… pic.twitter.com/I0eVXm8ztq
— ANI (@ANI) June 22, 2023
पोलिसांकडून गुन्हा दाखल होणार
या बॅनरबाजीवरून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी किंवा इतर कुणीही पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलिस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती या झोनच्या डीपीसींनी माध्यमांशी बोलताना दिली. या बॅनर्समुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.