पाटणा: गेल्या काही काळापासून पूर परिस्थीतीला सामोरे जात असलेल्या बिहार आणि झारखंड मध्ये विजपडून 23 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील 13 जण औरंगाबाद आणि भागलपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तर, इतर 10 जण जामतरा, रामगड आणि पाकूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. यासर्वांचा मृत्यू मंगळवारी रात्री वीजपडून झाला आहे. तर, झारखंडमधील तीन जण यावेळी जखमी झाल्याचे स्थानीक पोलिसांनी सांगितले आहे.