मुंबई – राज्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर भाजपाला सत्तेबाहेर खेचून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. महिनाभरापूर्वी सत्तेत आलेल्या या सरकारचा गेल्या महिनाभरापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांना मिळले असून आदित्य ठाकरेंनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.
आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळाच्या यादीतून एका नेत्याचे नाव कापण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांचे नाव मंत्र्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. यावर माझ्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली होती. तसेच सुनील राऊत राजीनामा देणार असल्याचेच्याही चर्चा आहेत.
मात्र,
संजय राऊत म्हणाले कि, सरकार स्थापन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभवली आहे. मी किंवा माझे कुटुंबिय नाराज नाही. आम्ही आयुष्यभर पक्षासाठी काम करणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले. एक चांगले मंत्रिमंडळ राज्याचा कारभार करणार आहे. अनुभवी आणि हुशार नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. हे सर्व मंत्री चांगले काम करुन राज्याला नवी दिशा देतील, असे त्यांनी सांगितले.