Assam CM On Congress । देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येतीय. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून आपणच कसे जनतेच्या हिताचे काम करतोय हे दाखवून देत आहेत. त्यात आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भविष्य काय असेल याची भविष्यवाणी केलीय.
काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष राहील Assam CM On Congress ।
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारपेटा जिल्ह्यात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आले असता त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा केवळ प्रादेशिक पक्ष बनून राहील असा टोला लगावलाय. एवढं नाही तर त्यांनी काँग्रेसचा अजेंडा जेवणाच्या टेबलावर सेट केला जातो असेही म्हटले.
कधी काळी काँग्रेसवासी असणारे बिसवा यांनी भाजपचे कौतुक केले. त्यासाठी त्यांनी, “भाजप हा लोकशाहीवादी पक्ष आहे जो त्याच्या कार्यकर्त्यांनी बनवला आहे, परंतु जर तुम्ही काँग्रेस किंवा इतर पक्षांकडे पाहिले तर तो काँग्रेस फक्त त्यांचे नेते आणि कुटुंबाभोवती केंद्रित असणारा पक्ष आहे. “कुटुंबाच्या गरजेनुसार पक्षाची विचारधारा आणि अजेंडा बदलला जातो.”अशी टीका देखील त्यांनी केली.
ओडिशातील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीची घटना सांगताना सीएम सरमा यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली, “मी अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि धर्मेंद्र प्रधान यांसारख्या सर्वोच्च भाजप नेत्यांना अगदी सहज भेटू शकलो. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सर्वांसोबत बसून जेवण केले. आम्हाला सांगण्यात आले की भाजपमध्ये असेच चालते.
‘काँग्रेस आपले अपयश कसे लपवणार?’ Assam CM On Congress ।
या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 हून अधिक जागा जिंकेल आणि काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष राहील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, “या निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचा प्रभाव कमी होईल. ते आपले अपयश कसे लपवणार? कोणतेही राष्ट्रीय नेतृत्व उरणार नाही आणि तो प्रादेशिक पक्ष राहील.