हांगझोऊ :- यजमान चीनविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दारुण पराभवानंतर विजय आवश्यक असणाऱ्या भारतासाठी आशियाई क्रीडा फुटबॉल स्पर्धेच्या गुरुवारी होणाऱ्या “अ’ गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात “करो या मरो’ची स्थिती असणार आहे.
भारतीय संघ सोमवारी संध्याकाळी उशिरा येथे पोहोचला आणि योग्य विश्रांती आणि झोप न घेता मंगळवारी त्यांना चीनविरुद्ध पहिला सामना खेळला लागला. ज्यामध्ये भारतीय संघाचा 1-5 असा पराभव झाला. बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी इगोर स्टिमॅकच्या मार्गदर्शनाखालील भारताला आता विजय आवश्यक असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवण्याचे भारताचे उद्दीष्ट असणार आहे.
या सामन्यात विजय मिळवला तरी, तिसऱ्या क्रमांकाच्या चार सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून पात्र ठरलेल्या भारताला प्री-क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य संघांचा सामना करावा लागू शकतो. असे असले तरी बांगलादेशही काही भारतासाठी कोणत्याही स्तरावर सोपा संघ ठरलेला नाही. पहिल्या सामन्यात म्यानमारविरुद्ध 0-1 असा पराभव पत्करावा स्विकारावा लागल्यानंतर बांगला संघ देखील पुनरागमनासाठी उत्सुक आहे.
दुसरीकडे, चीनविरुद्धच्या सामन्यात व्हिसा विलंबामुळे बचावपटू कोन्सम चिंगलेनसाना सिंगला खेळता आले नाही. त्यामुळे आता त्याच्या संघातील पुनरागमनाने भारताचे मनोबल नक्कीच उंचावलेले असेल. चीनविरुद्धच्या सामन्यात सुरुवातील आक्रमण केल्यावर नंतरच्या सत्रात सुनिल छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ थकलेला दिसत होता.