पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे.
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या, त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी भारताकडून 267 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
मात्र,पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला आहे. भारताच्या डावानंतर पाऊस सुरू झाला त्यामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी कव्हर्सने झाकली आहे. पाकिस्तानचा डाव अजून सुरू झालेला नाही.
पावसामुळे अजूनही संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकलेलेच आहे.त्यामुळे पाकिस्तानचा डाव कधी सुरू होईल हे अजूनही निश्चित झालेलं नाही. जर DLS नुसार षटके वजा केली तर पाकिस्तानला 45 षटकांत 254, 40 षटकांत 239, 30 षटकांत 203 आणि 20 षटकांत 155 धावांचे लक्ष्य मिळेल.
भारताकडून हार्दिक पंङयाने सर्वाधिक 87 तर इशान किशनने 82 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही.
दरम्यान, पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.