आश्वी : संगमनेर तालुक्यातील कोल्हार – घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपुर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोराच्या टोळीचा पाठलाग करुन आश्वी पोलीसानी दोन दरोडेखोरांसह दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे २३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याचं दरोडेखोराच्या टोळीतील आणखी ८ जनाना असे एकून १० दरोडेखोर पकडले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मी, पोलिस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले याच्या समवेत गस्त घालत होतो. यावेळी लोणी – संगमनेर रस्त्यावरील चिंचपुर शिवारात असलेल्या वृन्दांवन हाॅटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक (एम. एच. १० ऐडब्ल्यू. ७१,) व (एम. एच. ४० बीएल ५५६९, तसेच एक पिकअप व्हॅन (एम. एच. २५ ऐजे २१४८) या तीन वाहणांनमध्ये संश्ययास्पद हालचाली दिसल्याने आम्ही चौकशीसाठी तिकडे वळालो.
पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रक मधील ८ ते ९ व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. त्यामुळे आम्ही पाठलाग करुन अरुण उर्फ बिभिषण काळे (वय – ३०, रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघाना पकडले. यावेळी त्याच्या वाहणाची तपासणी घेतली असता लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली.
पकडलेल्या दोघाकडे पळून गेलेल्याची माहिती विचारल्यानतंर त्यानी नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भिमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष ऊर्फ हरी ऊर्फ दादा भास्कंर काळे, चदंर ऊर्फ चदंऱ्या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिदें सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली.
यानतंर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भिमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीना पोलीसी खाक्या दाखवताच त्यानी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलीसाना दिली.
दरम्यान, यावेळी नगर येथिल पोलीस नाईक सुनिल चव्हाण यांच्या पथकाने उरवर्रित 5 दरोडेखोराच्या मुसक्या आवळत त्याना आश्वी पोलीसाच्या ताब्यात दिले. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात या बारा आरोपी विरुध्द गुरंव नबंर १०६/२०२० भादंवी कलम ३९९, ४०२ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती दिली.