Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतीत मोठी बातमी समोर आलीय. अशोक चव्हण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण लवकरच अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही देखील भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.
विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 12, 2024
रोहित पवार म्हणतात, “विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे!’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.