पुणे – ‘विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा’ अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा लाडक्या विठुरायाच्या भेठीला निघाला आहे. आज (दि. 12) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहरात दाखल झाला असून, सगळीकडे मांगल्याचे आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.
यंदा या सोहळ्यात भाविकांची संख्या ही लक्षणीय असणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळा दि. 12 जून रोजी आळंदीहून पुणे मुक्कामी राहील. दि. 14 रोजी सासवडकडे प्रस्थान ठेवेल. दि. 15 रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथेच राहिल. आणि त्यानंतर हरिनामाचा गजर करीत सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होईल.
View this post on Instagram
दरम्यान, आता हळूहळू पुण्यनगरीत वारकरी दाखण्यास होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर देखील अभंग आणि माउलींच्या नावाचा गाजर ऐकू येत आहे. अश्यातच, विठू माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांनी पुणे मेट्रोचा आनंद घेतल्याचं दिसून आलं आहे. यावेळी वारकऱ्यांनी अतिशय भक्तीभावाने मेट्रोतून प्रवास केला. पुणे मेट्रोने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.