शिलॉंग (अरूणाचल प्रदेश) : अरुणाचल प्रदेशात तब्बल 14 हजार फुटांवरून 111 पर्यटक आणि नागरिकांची भारतीय लष्कराने सुटका केली. त्यांच्या मानवतावादी कार्याने या भागात लष्कराची प्रशंसा केली जात आहे.
या सुटकेची मोहीम 29 फेब्रुवारीला सुरू झाली. लष्कराची दोन पथके, त्यांची वैद्यकीय पथके आणि वाहने एक मार्चच्या रात्रीपर्यंत नागरिकांना मदत पोहोचवत होते. आपल्या वाहनांतून अरूणाचल फिरण्यासाठी आलेले पर्यटक सेला पास भागात अडकले. त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश होता. स्थानिक आणि पर्यटकांना गरमागरम चहा, खाद्य पदार्थ आणि अन्न लष्करी जवानांनी पुरवले.
लष्कराने वेळीच आणि परिणामकारक मदत केल्याबद्दल या परिस्थितीवर लक्ष ठेवून असणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयाने लष्कराचे आभार मानले आहेत.