वस्तु व सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली शपथ
येरवडा: महाराष्ट्र शासनाने पाच दिवसाचा आठवडा जाहिर केल्यानंतर शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.45 वाजता कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे. त्यानुसारच सोमवारी वस्तु व सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाची अमंलबजावणी केली.
येरवडा येथील वस्तु व सेव करभवन येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.30
वा एकत्रित येवुन शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच राजपत्रित अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रदिप रणपिसे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या या निर्णयाची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याची शपथ दिली.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विनायक लहाडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. व 15 वर्षाच्या लढ्याची पुर्तता केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बागले यांनी केले. कार्यालयीन कामकाजाची वेळ बदलली असली तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविणे संघटनेचे पदाधिकारी पंकज गायकवाड,राहुल गोर्डे, शीतल सुर्वे, श्रीमती पांढरे, श्रीमती वडकते, गायकवाड यांनी उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना गुलाब पुष्प देवुन वेळेवर कामावर येण्याची विनंती केली.