मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केले आहे.
यातच या मुद्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतरही ठाकरे सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केले आहे. भाजप नेते यासंदर्भात राजभवनात पोहोचले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली.
यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधला.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट…
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात तक्रार करण्यासाठी ‘भाजप’चे विरोधी पक्ष नेते दिल्लीला जाऊन आले. ‘विरोधी पक्षनेते’…
Posted by Rohit Rajendra Pawar on Wednesday, March 24, 2021