सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवू इच्छित उमेदवारांनी सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडाईत यांनी केले. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत विकासासाठी व जनतेला लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. निवडणूक वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने लढविणार आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील विविध वंचित समूहातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील वंचित घटकातील इच्छूक उमेदवारांनी केसरकरपेठ, चारभिंती, सातारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच दि.30 जुलैपर्यंत अर्ज भरून कार्यालयात जमा करावे, असे आवाहन खंडाईत यांनी केले. दरम्यान, उमेदवारांच्या मुलाखतींची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.