– सुनील राऊत
पुणे : पुण्यात विधानसभेच्या युतीच्या जागावाटपात एकही जागा वाट्याला न आल्याने पुण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मंगळवारी सकाळी मातोश्रीच्या वाटेवर निघाले आहेत.
पुण्यात शिवसेनेवर होत असलेल्या राजकीय अन्यायाची व्यथा हे पदाधिकारी पक्षाच्या नेत्यासमोर मांडणार असून पक्षाकडून योग्य पद्धतीने समाधान न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, सर्वच पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाल्याने पक्षाच्या डेक्कन येथील मुख्य कार्यालयास टाळे असून ऐन निवडणुकीत बंद असलेले हे कार्यालय शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.