मुंबई – राज्यातील साखर कारखानदारीकडे आणि त्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. साखर कारखाने विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत अण्णा हजारेंनी चौकशीसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले. यामध्ये अंदाजे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अण्णांनी अमित शहांकडे केली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत करावी, असंही त्यांनी म्हटलं.
सध्या राज्याचे साखर उत्पादन 7 कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त नसतानाही 9.30 कोटी मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली” असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.