मुंबई – महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे ‘ईडी’च्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. एवढच नाही तर, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणं चुकीचं होतं. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना घाईघाईने निर्णय घेतला गेल्याचे त्यांनी म्हटलं. राऊत नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान अनिल देशमुखांच्या वेळी शरद पवार दबावात नव्हते,’ असही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. पंरतु, आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे चुकीचे होते, असं राऊत म्हणाले.