वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये मानसिक ताण तणाव आणि स्पर्धात्मकता या परिस्थितीमुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे आणि लोकांचा रागीटपणाही वाढत चालला आहे. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे, रागीटपणाचा परिणाम फक्त हृदयावरच होतो असं नाही तर मेंदू आणि पोट यावरही आता विपरीत परिणाम होतो, म्हणूनच सर्वांनी रागीटपणावर नियंत्रण ठेवावे असा सल्ला आता आरोग्य तज्ञांनी दिला आहे.
रागीटपणा संपूर्ण शरीराला आजारी करू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे. रागाच्या कालावधीमध्ये रक्तदाब वाढत असतो आणि रक्तवाहिन्याही आकुंचित पावत असतात त्याचा थेट परिणाम हृदयावर आणि मेंदूवर होतो आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊन जीवही जाऊ शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे. रागाच्या कालावधीमध्ये मेंदूरही विपरीत परिणाम होतो आणि रागाची प्रक्रिया सुरू असताना मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोतील मानसोपचारतज्ञ प्रोफेसर रोइले सी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रागाच्या भरात माणूस आपल्याला जे पसंत नाही ते सुद्धा निर्णय घेतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मानसिक भावभावना आणि पोट यांचाही थेट संबंध आहे रागामुळे माणसाच्या पचनशक्तीवर थेट परिणाम होतो आणि गॅस्ट्रोसारखे विकार होऊ शकतात रागाच्या कालावधीमधील पोटातील मासपेशी सक्रिय होतात त्यामुळे त्यांची नेहमीची प्रक्रिया बिघडून जाते.
मेडिकल स्कुल ऑफ एलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट फ्लेमबर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जरी दरवेळी रागीटपणावर नियंत्रण ठेवणे शक्य नसले तरी सर्वांनी त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा भरपूर झोप घेणे आणि इतर गोष्टींमध्ये मन रमावणे यामुळे रागीटपणा कमी होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.