मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात सुरु असलेल्या संघर्षाला भाजपच्या मागहर घेण्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार न देता, भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही अप्रत्यक्षपणे ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई होती. पण भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जनमताचा आदर ठेवत पोटनिवडणूक दीड वर्षांसाठीच असल्याने तसंच सर्वांनी आग्रह केल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वर्गीय लटकेंच्या सौभाग्यवतींना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना कोर्टाते गेले, इतका संघर्ष केला याची आठवण करुन दिली असता त्यांनी संतापून ‘म्हणून मी बोलत नाही, याला काय अर्थ आहे. माघार घेतली म्हणजे सगळं संपलं,’ असे उत्तर दिले.