Ambani Family । जगातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनंत अंबानी यांच्या घरी पुन्हा शुभ कार्य होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. दोघे 12 जुलैला मुंबईत लग्न करणार आहे. मात्र त्याआधी अंबानी परिवाराने एका भव्य कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग… गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च या कालावधीत प्री-वेडिंगचा भव्य सोहळा होणार आहे. या जोडप्याच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूड स्टार्स, राजकीय व्यक्ती, मोठे उद्योगपती, आंतरराष्ट्रीय पाहुणे याशिवाय सहभागी होणार आहे.
सध्या अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग चांगलेच चर्चेत आले आहे. अशात त्यांनी परी वेडिंग साठी परदेशात ठिकाण न ठेवता किंवा भारतातील गुजरातमध्येच का प्री-वेडिंग ठेवले आहे असा प्रश सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यांनी गुजरातमधील जामनगरची निवड का केली असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? असेही सोशलवर विचारले जात आहे. याचे कारण पीएम मोदी आहेत
अनंत अंबानींच्या म्हणण्यानुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतात लग्न करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाने ते खूपच प्रभावित झाले आहे. याच कारणामुळे त्यांनी देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन घेण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले.
जामनगरवर विशेष प्रेम
अनंत अंबानींच्या म्हणण्यानुसार, ‘त्यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला होता. तर त्यांचे आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांनी जामनगरमधूनच व्यवसाय सुरू केला. या कारणास्तव त्यांना जामनगरशी विशेष प्रेम आहे. अनंत अंबानींच्या म्हणण्यानुसार, ते जामनगरमध्येच वाढले.’
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्नासाठी परदेशी ठिकाण निवडणाऱ्या जोडप्यांना भारतात लग्न करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले होते की, काही मोठ्या कुटुंबांच्या परदेशात लग्ने आयोजित करण्याच्या प्रवृत्तीमुळे ते त्रस्त आहेत. पीएम मोदींनी त्यांच्या आवडत्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ बदलण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा
Sandeshkhali case । संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी शहाजहान शेखला तब्बल ५७ दिवसांनंतर अटक