मुंबई: विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला. कोणत्याही एका पक्षाला यावेळी बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असून शिवसेनेचे सर्व आमदार मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून आग्रही आहेत.
आज शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांचा कल जाणून घेतला. मात्र या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेण्यात आला हे अजून अधिकृतरित्या समजले नाही.
दरम्यान, महायुतीच्या यशाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले. सत्तास्थापनेसाठी दिवाळीनंतर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.