नागपूर – पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठ उभ राहायचे म्हणून मी आलो नाही, तर माझे मुळात मन नव्हते, म्हणून मी आजच्या फोटोशेनला आलो नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टोला लगाविला. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज विधान भवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन झाले. पण फोटोसेशनवेळी एक चर्चा मात्र जोरदार होती. या फोटोसेशनला आदित्य ठाकरे हे मात्र उपस्थित नव्हते. त्यावर आता त्यांनी खुलासा दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले, फोटोसेशनमध्ये सहभागी व्हायला माझं मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी झालो होतो. पण येथे घटनाबाह्य सरकार निर्माण झाले आहे, त्या सरकारमध्ये फोटोसेशन करण्याचा माझं मन नव्हतं. समोरच्या रांगेत सगळे घटनाबाह्य सरकारमधील मंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मागच्या रांगेत उभा होतो.
🕛 12.10pm | 14-12-2023📍 Vidhan Bhavan, Nagpur | दु. १२.१०वा. | १४-१२-२०२३ 📍 विधान भवन, नागपूर
📸Group Photo !
One with all the MLAs from Legislative Assembly
And
the other with our NariShakti representing the legislature!
📸 विधिमंडळ अधिवेशन सत्रादरम्यानचे छायाचित्र!
एक… pic.twitter.com/tSDAliK7j7— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2023
दुसरीकडे सिनेटची निवडणूक घेत नाही, ना लोकसभेची निवडणूक घेत आहेत, हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे, अशी टीका त्यांनी केली. या सरकारने महाराष्ट्रामध्ये लोकतंत्र मोडीत काढले आहे. चंद्रपूर, पुणे लोकसभा निवडणुका झाल्या नाहीत. इलेक्शन कमिशन निवडणूक घ्यायला तयार नाही. कुठलीच निवडणूक घ्यायला सरकार आणि निवडणूक आयोग तयार दिसत नाही.
मराठा आरक्षणाची चर्चा सुरू असताना विधान भवनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत. एकीकडे आमदार बोलत आहेत, पण मुख्यमंत्री अनुपस्थितीत आहेत. दुसरीकडे कोस्टल रोडला आता हे सरकार टोल लावायचा विचार करत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यामध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. याची माहिती घेऊन सांगतो.