मुंबई – ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या व्यक्तिरेखेला सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. आता अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरने खुलासा केला आहे की आलियाने एका आठवड्यात दोन लग्ने केली आहेत.
रणवीर आलियाचा ‘रॉकी अँड रानी’च्या भूमिकेतील अभिनय आणि त्यांची धमाकेदार केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. चित्रपटातील ‘कुदमयी’ गाण्यात दोघांच्या लग्नाचा सिन देखील पाहायला मिळतो. या बाबतच करण जोहरने एक खुलासा केला आहे. जो ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत आलियाने रिअल लाइफमध्ये विवाह केला होता. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण जोहरने खुलासा केला की, या चित्रपटातील लग्नसोहळा आलिया आणि रणबीर कपूरसोबतच्या खऱ्या लग्नानंतर काही दिवसांनी शूट करण्यात आला होता.
आलियाच्या खऱ्या लग्नानंतर चार दिवसांनी हे शूट करण्यात आल्याचे करणने स्पष्ट केले. यामुळे आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केले असा खुलासा देखील करणने यावेळी केला. तसेच करणने सांगितले की, त्याने चित्रपटात आलियाच्या लग्नातील खऱ्या मेहेंदीचा वापर देखील केला होता यामुळे हा चित्रपटातील लग्नाचा सिन चांगला होऊ शकला.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ बद्दल बोलताना, रोमँटिक कॉमेडी ड्रामामध्ये आलिया आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटासाठी करण जोहरने तब्बल सात वर्षानंतर दिग्दर्शकाच्या भूमिकेत परतला होता.