मुंबई – शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता तिसरे नाव पान मसाल्याच्या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. त्यामुळे आता अक्षय चांगलाच अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारने टीव्हीवर ‘बोलो केसरी..’ बोलल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी अक्षयच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
स्वच्छ प्रतिमा असलेला अभिनेता कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला प्रोत्साहन देणाऱ्या उत्पादनाचा प्रचार करत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी या जाहिरातीमध्ये अभिनेता अजय देवगण दिसत होता, त्यानंतर अभिनेता शाहरुख खानची यामध्ये वर्णी लागली. आणि आता अक्षय कुमार देखील ‘बोलो जुबान केसरी..’ म्हणत आहे. नुकतंच या उत्पादकाची जाहिरात टीव्हीवर येण्यास सुरु झाली आहे. त्यामुळे आता अक्षयला ट्रोल केलं आहे.
पहिलाज निहलानी यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘माझा ठाम विश्वास आहे की, जिथे अक्षय कुमार एका सामान्य माणसाला सिगारेट ओढण्याऐवजी सॅनिटरी पॅडवर पैसे खर्च करायला सांगतो, त्याला आतापासून चित्रपटांमधून काढून टाकले पाहिजे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. एकीकडे एक प्रसिद्ध सुपरस्टार जनतेला सिगारेटवर खर्च करू नका असे सांगत आहे. तर दुसरीकडे हाच अभिनेता पान मसाला खाण्याचा सल्लाही देत आहे. हा सर्व प्रकार जनतेसाठी अतिशय गोंधळात टाकणारा आहे.’ असं ते म्हणाले.