मुंबई – छत्रपती शिवाजी महापुरुषांबाबत बोलताना आजवर मी कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे बोललो किंवा विधान केलेले नाही. छत्रपती संभाजी महाराज एका धर्माचे होते का? त्यांनी एका धर्मासाठीच काम केले का? स्वराज्यरक्षकात शौर्य येते. रक्षण येते आणि धर्मही येतो. स्वराज्य रक्षक संकल्पनेत स्वराज्य निर्मिती, समाज, संस्कृती आणि धर्म या सर्व गोष्टी येतात, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे.
या प्रकरणावरून सुरु असलेल्या वादावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पडदा पाडला आहे. अजित पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता, त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते.
जे शब्दप्रयोग त्यांनी वापरायला नाही पाहिजे होते ते वापरले होते. कालचे दोन दिवसांपासून भाजपने त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आदेश दिले की, तुम्ही अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा.
मला भाजपने विरोधी पक्षनेते पद दिले नाही, मला राष्ट्रवादीचे विधानसभेचे 53 आमदार आहेत. त्यांनी हे पद दिले आहे. त्यामुळे त्यांना मला पदावर ठेवायच की नाही हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्याच मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही, असेही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले.