नेवासा(प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणचे खासगीकरण करणार नाही असा शब्द दिल्यानंतर महावितरण, महाजनको आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधातील अभियंता व कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय पुकारलेला संप पहिल्या दिवशी मिटला आहे.
खाजगीकरण होणार नाही या निर्णयामुळे नेवासा येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. हे एकीचे बळ व समाजाच्या पाठबळ व दिलेल्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया महावितरण कंपनीचे नेवासा विभागाचे सहायक अभियंता व अहमदनगर सर्कल अध्यक्ष एस.इ. ए.चे माजी अध्यक्ष मनोहर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
यावेळी बोलताना मनोहर पाटील म्हणाले की, मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून महावितरणच्या खाजगीकरणा विरुद्ध 3 दिवसांचा (४,५,६ जानेवारी) संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये सर्व संघटना ही सहभागी झाल्या होत्या, हा संप आमच्या कुठल्याही आर्थिक मागण्यांसाठी नव्हता, जर खाजगीकरण झाले असते तर ग्राहकांना खाजगी कंपनीच्या मनमानी दराने वीज विकत घ्यावी लागली असती, आणि ग्रामिण भागातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहक यांनी मिळणारी सबसिडी पण बंद झाली असती,मात्र सरकारने संपाच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खाजगीकरण होणार नसल्याचे जाहीर केल्याने सरकारचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता यांनी कामगार युनियनशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर व खाजगीकरण न करण्याबाबत लेखी दिल्यामुळे राज्यातील अभियंता कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी यांनी पुकारला संप मागे घेण्यात आला असल्याचे सहायक अभियंता मनोहर पाटील यांनी आमच्या माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.