मुंबई – अजित पवारांच्या नातलगांशी संबंधीत सोळाशे कोटी रूपये किंमतीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश आयकर विभागाने जारी केले असले तरी या मालमत्तांशी अजित पवारांचा काहींही संबंध नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवरचा दबाव वाढवण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की पश्चिम बंगालमध्ये केंद्रातीाल भाजप सरकारने केंद्रीय यंत्रणा वापरून जो धुमाकुळ घातला होता, तसाच प्रकार आता महाराष्ट्राच्या बाबतीत सुरू आहे.
केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईची दहशत निर्माण करून अनेक तृणमुल नेत्यांना त्या पक्षातून फोडून भाजप मध्ये नेण्यात आले होते याची आठवणही मलिक यांनी करून दिली आहे.
म्हणूनच भाजपमध्ये गेलेले काही नेते आज जाहीरपणे सांगत आहेत की आम्ही भाजप मध्ये गेल्याने आम्हाला आता शांत झोप लागते असेही मलिक यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्याचा दाखला देत नमूद केले आहे.