मुंबई – एकीकडे अर्थव्यवस्था विस्तारित होत असताना फास्टॅगच्या माध्यमातून होत असलेल्या टोल कलेक्शनमध्यही वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात फास्टॅगच्या माध्यमातून तब्बल 3,356 कोटी रुपयाचे टोल कलेक्शन झाले आहे.
हा एक उच्चांक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 21.42 कोटी फास्टॅगचे व्यवहार झाल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यात 3,000 कोटी रुपयाचे टोल संकलन झाले होते. तर ऑगस्ट महिन्यामध्ये 3,076 कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते.
त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वेग घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्त्यावरील वाहतूक वेगात व्हावी व टोल संकलन वाढावे याकरिता 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून महामार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही. त्याचबरोबर या व्यवस्थेतील भ्रष्टाचार निर्मूलन होण्यास मदत मिळाली आहे.