शिर्डी – नगर- नाशिक जिल्ह्यात भविष्यासाठी सर्वात महत्वाच्या घाट माथ्याच्या ११५ टीमसी पाण्यासाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
त्यांनी निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त २००५ साली झालेला समन्यायी पाणी वाटप कायदा हा काळा कायदा असून नगर व नाशिक जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांवर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने व नेत्यांनी मोठा अन्याय केला आहे. यातून जर मार्ग काढायचा असेल तर पश्चिमला वाहून जाणारे घाटमाथ्याचे पाणी चांगला पर्याय असल्याचे सांगितले. यासाठी केंद्र सरकारने तत्काळ राज्य सरकारला निर्देश देत प्रस्ताव पाठविण्यासाठी सांगावे, अशी विनंती खासदार लोखंडे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. येणाऱ्या काळात नक्कीच याचे सकारात्मक फळ नगर- नाशिकच्या जनतेला पाहायला मिळेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.