चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी सिनेसृष्टीला आजवर एकाहून एक हिट कॉमेडीपट दिले आहेत. यामध्ये अक्षयकुमारला घेऊन बनवलेल्या चित्रपटांची संख्या तुलनेने अधिक आहे. विशेष म्हणजे, अक्षयकुमारला घेऊन बनवलेल्या चित्रपटांनी तिकीट खिडकीवरही चांगला गल्ला जमवला आणि दीर्घकाळ ते प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट बनून राहिले.”हेराफेरी’, “गरम मसाला’, “भूलभुलैय्या’ आणि “दे दणादण’ यांसारख्या चित्रपटांना तुफान लोकप्रियता मिळाली.
छोट्या पडद्यावर तर आजही हे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. आता प्रियदर्शन पुन्हा एकदा अक्षयकुमारसोबत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी तो एका नव्या चित्रपटाच्या कामाचा शुभारंभ करणार असून साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल असे प्रियदर्शन सांगतो.
प्रियदर्शन यांनी “हाऊसफुल 4′ हा चित्रपट केला; पण तो माझ्या मनासारखा झाला नाही असे तो सांगतो. सध्या तो “हंगामा-2′ च्या तयारीत मग्न आहे. 2003 मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा थेट सिक्वल नसल्याचे तो सांगतो. या चित्रपटातून शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.