नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणातल्या सुनावणीत देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडत असल्याचं वादग्रस्त विधान मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे.
Advocate Rajeev Dhavan, who represented Sunni Central Waqf Board in Ayodhya case on his reported statement,’It is Hindus, not Muslims who disturb peace’: This is television mischief. When I speak of Hindus, I am not speaking of Hindus generally. pic.twitter.com/FBVaZbjgL5
— ANI (@ANI) November 27, 2019
याच पार्श्वभूमीवर राजीव धवन यांनी आज वृत्त माध्यमांशी बोलताना सांगितले की,’माझ्या विधानाचा मीडियानं विपर्यास केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘या प्रकरणात हिंदू शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ संघ परिवार असा असतो. मी कोर्टातही सांगितलं आहे की, ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते हिंदू तालिबानी होते. त्यावेळी मी संघ परिवार आणि त्या विशिष्ट वर्गासंबंधी बोलतो होतो, जे हिंसा आणि लिंचिंगसारख्या प्रकारांना पाठबळ देतात. असं म्हणत राजीव धवन यांनी संघावरही निशाणा साधला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.