नवी दिल्ली – केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी देशभरात होता आहे. तसेच या मागणीसाठी सर्वपक्षीयकडून महामोर्चा काढण्यात आली आहे. तर याच मुद्दाबाबत बोलत असताना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अजब विधान केल आहे ज्यामुळे सध्या त्यांच्या व्हिडियो व्हायरल झालं आहे. पोहे खाण्यावरून मी एक मजूर हा बांग्लादेशी आहे हे ओळखलं होतं असा दावा केला आहे.
दरम्यान, इंदूर येथे कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय बोलले की ‘माझ्या घरी एका खोलीचं काम सुरू होतं. त्यासाठी जे मजूर आले होते त्यांची खाण्याची पद्धत पाहून मला थोडं विचित्र वाटलं. ते फक्त पोहे खात होते, मी त्यांच्या मुकादमाला विचारलं की हे बांग्लादेशी आहेत का ? यानंतर दिवसांनी ते सगळे मजूर कामावर आलेच नाहीत विजयवर्गीय यांनी सांगितले की त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाहीये. ‘मी सगळ्यांना सतर्क करतोय कारण देशांतर्गत सुरक्षेला हा मोठा धोका आहे. असं ही ते म्हणाले आहे.