जयपूर : आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये तरुण पिढीचे वाचन कमी झाल्याची हाकाटी केली जाते मात्र माझा अनुभव असा आहे की तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर वाचत आहे आणि लेखकांना प्रश्न विचारत आहे हे चित्र समाजाच्या दृष्टीने अत्यंत आश्वासक आहे असे प्रतिपादन विख्यात लेखक आणि मुलाखतकार अश्विन संघी यांनी केले.
जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी ते दैनिक प्रभात शी बोलत होते अश्विन संघी पुढे म्हणाले की प्रत्यक्ष पुस्तक वाचणे नेटफ्लिक्स वर मालिका बघणे किंवा किंडल अथवा ॲमेझॉन वर पुस्तक वाचणे हे प्रकार आता वेगवेगळ्या स्वरुपात असले तरी मुले वाचत आहेत ही गोष्ट फार मोठी आहे.
वाचकाची लेखकाला मिळणारी दाद ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असून त्यामुळे लेखकाचे विचार वाचकांच्या मनात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. जयपूर साहित्य संमेलनाविषयी अश्विन संघी म्हणाले की या ठिकाणी जगभरातून येणारे लेखक आणि लक्षावधी वाचक यांच्यामध्ये होणारा संवाद म्हणजे एक अत्यंत चांगला सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा प्रयत्न असून आजच्या तरुण पिढीची वाचनाची आवड किती मोठी आणि विस्तृत आहे हे त्यावरून समजून येत आहे. अश्विन संघी यांनी या उत्सवातून होणाऱ्या एकूण विचार मंथन याबाबत अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया नोंदवली
ऐतिहासिक चित्रपट आवश्यक
ऐतिहासिक चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले आहेत मी स्वतः तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट पाहिला त्याच्या ऐतिहासिक संदर्भ बद्दल काही वाद आहे हे मान्य केले तरी ही अशाप्रकारची चित्रपट तयार होणे अत्यंत आवश्यक आहे कारण आजी आजोबा सध्या घरातून हद्दपार झाले आहेत त्यामुळे आपल्या मुलांना रामारण, महाभारत व इतिहास समजावा यासाठी त्यांना असे चित्रपट दाखवणे अत्यंत आवश्यक आहे.