दुबई – आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तानचे संघ थोडयाच वेळात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना असून दोन्ही संघांना विजयासह स्पर्धेतील आपला प्रवास संपवायचा आहे. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. त्याचवेळी अफगाणिस्तानला आधी श्रीलंकेने आणि नंतर पाकिस्तानने पराभूत केले.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा अफगाणिस्तानच्या बाजूनं लागला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नाबीने टाॅस जिकूंन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं आहे. (Afghanistan won the toss and elected to field) भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाहीये. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी केएल राहुल कर्णधार आहे.
Afghanistan have won the toss and elect to bowl first against #TeamIndia
KL Rahul to Captain the team in the absence of Rohit Sharma.
Live – https://t.co/1UkuWxy3Ee #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/cgeEN8nJxD
— BCCI (@BCCI) September 8, 2022
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तानचे संघ चौथ्यांदा T20 क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाने यापूर्वी खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने 2010 मध्ये अफगाणिस्तानचा सात विकेटने, 2012 मध्ये 23 धावांनी आणि 2021 मध्ये 66 धावांनी पराभव केला होता. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा पहिला T20 सामना असेल.