मुंबई: चालू आर्थिक वर्षातील देशातला आगाऊ कर भरणा तब्बल 31 टक्क्यांनी घटला आहे. देशात या तिमाहीत 1 लाख 99 हजार 755 कोटी रुपये इतका करभरणा अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात तो 1 लाख 37 हजार 825 कोटी इतका झाला आहे.
या कालावधीत करोनाच्या लॉकडाऊनमुळे 80 टक्के व्यवहार बंद असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. 1 जूनपासून लॉकडाऊन बऱ्यापैकी उठवण्यात आला असला तरी अजून बाजारात म्हणावे तसे व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत.
त्यामुळे कर महसुलावर त्याचा मोठाच विपरित परिणाम झाला आहे. ऍडव्हान्स कर भरणा करण्याची मुदत 15 जून पर्यंत होती. ती मुदत संपल्यानंतर जो महसूल गोळा झाला आहे त्यानुसार ही घट 31 टक्के इतकी झाली आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले.