मुंबई – ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणातील काही माहिती चुकीची होती असा आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यपालांनी भाषणात उल्लेख केलेले अनेक प्रकल्प तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. विधानभवनाच्या प्रांगणात ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीबाबत राज्यपालांच्या भाषणातील विधाने थोडी चुकीची होती कारण बहुतेक प्रकल्प एकतर आम्ही सुरू केले होते किंवा आम्ही सत्तेत असताना त्यात प्रगती केली होती. कोणीतरी राज्यपालांची दिशाभूल केली आहे असे दिसते आहे असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यपाल म्हणाले की, राज्य सरकारने (एकनाथ शिंदे आणि भाजपच्या) गेल्या महिन्यात दावोस येथे झालेल्या परिषदेत 1.37 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. पण ज्या कंपन्यांनी आमच्या सरकारच्या काळात करार केले होते त्याच कंपन्यांनी दावोसला जाऊन पुन्हा महाराष्ट्राशी करार केला आहे काय असा सवाल त्यांनी केला.