जळगाव – दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या बैलगाडीला मागून जोरदार धडक बसल्यामुळे बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ घडली आहे.
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी असे अपघातात मृत्यू झालेल्या वडीलांचे नाव आहे तर नायरा सुर्यवंशी असे सात वर्षाच्या मुलीचे नाव आहे. ममता सुर्यवंशी(आई) व मोहित प्रभाकर सुर्यंवशी (मुलगा) असे जखमींची नावे आहेत. जखमींनी आई व मुलाला धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुर्यवंशी परिवार हा नरडाणा, ता. शिंदखेडा, जि.धुळे येथील रहिवाशी आहे. ते धरणगाव तालुक्यात एका नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. भेट झाल्यानंतर दुचाकीने परत जात असतांना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..