मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले.
दरम्यान, त्यानंतर शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचावर जोरदार हल्ला बोल चढवला आहे. यावेळी त्यांनी आजच्या दिवशी त्यांनी चोरलेलं धनुष्यबाण कागदावरचं आहे आणि खरं धनुष्यबाण माझ्याकडे आहे. अनेकांना वाटलं असेल की शिवसेना संपली पण शिवसेना लेचीपेची नाही. आमच्याकडे धनुष्यबाण आहे शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यात आहे. त्याची पूजा आजही आम्ही करतो आणि तो पुजेतच राहणार असल्याचं ठामपणे उद्ध ठाकरे यांनी सांगितलं.
पण आता हा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेट दिल्याचं समोर आलं आहे. एक प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असता त्यांना याबद्दल विचारलं असता, ‘मी दिलेल्या गोष्टी काढत नाही. मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील.’ असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. तसेच ते पुढे म्हणाले, “आम्हाला संपत्तीचा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. यावर आम्हाला बोलायचं नाही’, असं देखील शिंदे म्हणाले आहेत.