नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मेघालयातील निवडणूक रॅलीत भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी बुधवारी सांगितले की त्यांचा पक्ष बाहेरून आलेल्या लोकांना ईशान्येकडील राज्यातील रहिवाशांवर CAA आणि NRC लागू करू देणार नाही.यावेळी त्यांनी राज्यातील संगमा सरकारवर “विकासाची कामे करत नसल्याचे म्हणत घोटाळा केल्याचा आरोपही केला.
बॅनर्जी मेघालयातील एका निवडणूक रॅलीत म्हणाल्या , बाहेरून येणाऱ्या लोकांना तुमच्यावर CAA, NRC लादू देऊ नका.”टीएमसी मेघालयचा विकास करू शकते… हे सरकार बदला… इथे काहीही नाही,” मेडिकल कॉलेज नाही, उपचारासाठी चांगली आरोग्य व्यवस्था नाही असत म्हणत ममता बॅनर्जी यांनी लोकांना त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.मेघालयात टीएमसीला मतदान करा, आम्ही भाजपला दिल्लीतून हद्दपार करू अशी घोषणा देखील ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.
राज्यातील 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 119 कंपन्या मेघालयमध्ये तैनात केल्या आहेत. मेघालयचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आमच्याकडे 40 तुकड्या होत्या ज्या यापूर्वी तैनात करण्यात आल्या होत्या आणि आणखी 79 कंपन्या त्रिपुरा निवडणुकीनंतर समाविष्ट करण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही घटना घडलेली नाही. दुर्दैवाने सोह्योंग मतदारसंघातील एका उमेदवाराचे निधन झाले. आम्ही निवडणूक आयोगाला माहिती पाठवली आहे अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिल्याचे उमजते.