माई म्हणजेच सौ.सिंधुताई सपकाळ आज संपूर्ण जगाला सुपरिचित आहे. त्यांचा चित्रपट असो किंवा त्यांचं प्रेरणादायी आत्मकथन ‘आईच्या काळजातून ‘, मासिक साप्ताहिक दैनिकांमधून माईने केल्याल्या सेवाकार्याबद्दल प्रसिध्द झालेले लेख अश्या विविध माध्यमातून माई आणि त्यांचे कार्य जगाला माहित आहे. आजच्या महिला दिना निमित्त त्यांच्या आयुष्यातला क्षण सांगू इच्छितो.
सासर-माहेराने आयोजित केलेला सत्कार सोहळा दिनांक १५ डिसेंबर २०१३ रोजी पार पडला. महाराष्ट्र राज्यातील मंत्री, मान्यवर अतिथी उपस्थित होते. अगदी दिमाखात सत्कार सोहळा पार पडला. माई उपस्थितांना भेटण्यासाठी मंचावरून खाली जाताना मंचाच्या डाव्या बाजूला कोणी तरी रडत असल्याच आवाज आला. माईने हुंदक्या च्या दिशेनी पाहिलं. माईंचे पती म्हणजे स्व.श्रीहरी सपकाळ हुमसुम हुमसुम रडत होते. ती त्यांच्या जवळ गेली, तिने हसत हसत रडणाऱ्या पतीचा हात आपल्या हाती घेतला. स्वत:च्या पदराने पतीचे डोळे पुसले ,अवस्था वाईट होती. धोतराला गाठी डोक्यावरचा पागोट वसादर फाटलेला अशी त्यांची अवस्था पाहून माईने विचारले
”रडताय….? आठवतंय का ओ ? दहा दिवसांची ओली बाळंतीन असताना आपण मला हाकलून लावले , ते माझ्या पातळाला गाठी होत्या आज तुमच्या धोतराला आहे , रडू नका, कोणी कोणाचे नसते किवा कोणाचे कोणावाचून अडलेल नसतं,इथे वाईट अवस्था मध्ये पडू नका , माझ्या सोबत चला . पण माझी एक अट आहे, नवरा म्हणून नाही , आता मला तुमची पत्नी होता येणार नाही , माझे बाळ म्हणून येताय ? मी तुमची पण आई व्हायला तयार आहे ….. !! घाबरू नका मी हजारो अनाथ लेकरांची आई आहे . दोनशे हून अधिक जावई आहेत, पन्नास सुनांची सासू आहे आणि पावणे दोनशे गाईची माई झाले. आठशे हून अधिक पुरस्कारांची मानकरी ….. ‘ फॉरेन रिटर्न आपल्या समोर उभी आहे… हे सर्व आपण मला सोडले म्हणून घडले .. मी आपली आभारी आहे.
अशी हि माई , माई नेहमी म्हणते “जब तक गाल पे गोश तब तक यारभी दोस्त, जब गोश हट जाये यार भी तुट जाये.”
– अभिजित पोखरणीकर ,
कॉलेज रिपोर्टर,
अभिनव एज्युकेशन सोसायटी